मुंबईत खड्डे आणि ट्रॅफिकमुळे तीन टक्के घटस्फोट; अमृता फडणवीसांचा सेनेवर निशाणा

मुंबई नगरी टीम

मुंबई । मुंबईतील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक आहे, शिवाय रस्त्यावर खड्डे आहेत.ट्रॅफिकमुळे तीन टक्के घटस्फोट होतात. त्यामुळे आपण कुटुंबाला वेळ देवू शकत नाही, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सत्ताधारी शिवसेनेवर आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निशाणा साधला आहे.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे.मी माजी मुख्यमंत्री फडणवीसांची बायको आहे हे तुम्ही विसरून जा.मी सामान्य नागरिक म्हणून बोलत आहे. मी रोज सामान्य स्त्री सारखी घराबाहेर पडते.त्यावेळी मलाही ट्रॅफिक आणि रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्रास होतो असे सांगून ट्रॅफिकमुळे तीन टक्के घटस्फोट होतात अशा शब्दात त्यांनी सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.या त्रासामुळे आपण कुटुंबाला वेळ देवू शकत नाही. मुंबई शहरात अनेक प्रश्न आहेत. मेट्रो, रस्ते, एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत. त्याकडे लक्ष न देता सरकार खिसे भरू लागले तर त्यावर टीका होणारच असेही त्या म्हणाल्या.

Previous articleकोरोनाची तिसरी लाट केव्हा संपणार ? आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती
Next articleविरोधी पक्षनेता सरकारला कशा प्रकारे वठणीवर आणू शकतो हे दरेकर यांनी दाखवून दिले