उद्या तृतीयपंथी सुध्दा राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो,बहुमत आणा आणि व्हा मुख्यमंत्री !

मुंबई नगरी टीम

मुंबई । भाजपचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ब्राम्हण व्यक्तीला या राज्याचा मुख्यमंत्री झाल्याचे पाहू इच्छितो असे वक्तव्य केले आहे.त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.मुख्यमंत्री कुठल्या जातीचा व्हावा हा प्रश्न नाही उद्या तृतीयपंथीसुध्दा राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो.त्यामुळे विशिष्ट जातीचा मुख्यमंत्री व्हावा असे म्हणणे योग्य नाही.१४५चे बहुमत आणा आणि व्हा मुख्यमंत्री.कुणी अमुक जातीचा होईल या बोलण्याने मुख्यमंत्री होत नसतो अशा शब्दात पवार यांनी रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यावरून राज्य सरकारला अल्टिमेटम दिला होता.यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.अल्टिमेटम कुणी द्यायचा नाही,अशी हुकुमशाही चालणार नाही.तुम्हाला अल्टिमेटम द्यायचा असेल तर स्वतः च्या घरात द्या.कायद्याने जे काही आहे ते आम्ही करणार असा सज्जड इशाराही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिला.भाजपचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ब्राम्हण व्यक्तीला या राज्याचा मुख्यमंत्री झाल्याचे पाहू इच्छितो असे वक्तव्य केले आहे. त्यालाही पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.मुख्यमंत्री कुठल्या जातीचा व्हावा हा प्रश्न नाही उद्या तृतीयपंथीसुध्दा राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो.त्यामुळे विशिष्ट जातीचा मुख्यमंत्री व्हावा असे म्हणणे योग्य नाही.१४५ चे बहुमत आणा आणि व्हा मुख्यमंत्री.कुणी अमुक जातीचा होईल या बोलण्याने मुख्यमंत्री होत नसतो अशा शब्दात पवार यांनी यावेळी रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

अल्टिमेटमची भाषा कुणी करु नये.कायद्याने हे सरकार चालते.यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी योग्य त्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत असेही पवार म्हणाले.अशापध्दतीने वक्तव्य करणे योग्य नाही.जो काही निर्णय करायचा ठरला तर सर्वांना बंधनकारक असेल.वेगवेगळ्या धर्माला नियम लागू होईल असे सांगतानाच पवार यांनी उत्तरप्रदेशमध्ये जे घडले त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने २००५ मध्ये निर्णय दिला होता त्याची अंमलबजावणी करण्यात आल्याचे स्पष्ट केले.कायदा व सुव्यवस्था अडचणीत येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.राज्यात जी धार्मिक स्थळे आहेत त्यांनी भोंगे लावण्याची परवानगी घ्यावी तसेच आवाजाची मर्यादा ओलांडू नये असे सांगतानाच परवानगी घेतली नसेल तर त्या घ्याव्यात.यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही पवार यांनी केले.

भोंगे लावण्यासाठी ठराविक दिवसात परवानगी घ्यावी असे सांगतानाच परवानगी घेतली नाही तर कठोर भूमिका घेतली जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.कायदा कुणी हातात घेण्याचा व तसे करण्याचे धाडस कुणी करु नये.न्यायालय जो निर्णय देईल त्याचे पालन करण्याचे सर्वांचे काम आहे असेही पवार म्हणाले.राज्यात ग्रामीण बागात उशिरा दहाच्या पुढे हरिनाम सप्ताह,जागरण,गोंधळ असे कार्यक्रम सुरू असतात. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाचे तंतोतंत पालन करुन सगळ्यांनी सहकार्य करावे.सध्या काही ठिकाणी आवाज कमी झाले आहेत.त्यामुळे आता सर्वांनाच याची अंमलबजावणी करावी लागणार आहे.ओबीसी आरक्षणासंदर्भात बोलताना पवार म्हणाले की, विरोधकांचे आरोप हे रडीचा डाव आहे.ओबीसीबाबत सरकारने योग्य भूमिका मांडली आहे.सभागृहात विरोधकांच्या मदतीने ठराव झाले आहेत.ओबीसींना आरक्षण मिळावे ही सरकारची भूमिका आहे.सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे.त्यावर मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आहे.पण शेवटपर्यंत ओबीसींना प्रतिनिधीत्व मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.चांगलं झाले तर आम्ही मिळून केले आणि चांगले झाले नाही तर ही सरकारची चूक आहे असे विरोधक ओरडत आहेत असा टोलाही पवार यांनी विरोधकांना लगावला.

Previous articleओबीसी आरक्षण धोक्यात येण्यास सर्वस्वी राज्य सरकारच जबाबदार : प्रविण दरेकर
Next articleभाजपचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल ! महाराष्ट्राचा अपमान केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी जाहीर माफी मागावी