राज ठाकरे म्हणाले…मशिदींवरील भोंग्यांचा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे

मुंबई नगरी टीम

मुंबई । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसेच्या सैनिकांना समाज माध्यमातून एक पत्र शेअर करीत,मशिदींवरील भोंग्यांच्या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हात घातल्यानंतर राज्यातलंच नव्हे तर देशातलं राजकारण ढवळून निघालं.आता हा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे असे आवाहन केले आहे.

मशिदींवरील भोंग्यांच्या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हात घातल्यानंतर राज्यातलंच नव्हे तर देशातलं राजकारण ढवळून निघालं. आता हा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यासाठी आपला विचार प्रत्येकापर्यंत पोहोचायलाच हवा. म्हणूनच माझं एक पत्र मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत आपल्या पदाधिका-यांपर्यंत पोहोचवण्यात आलं आहे. ते त्यांच्याकडून घ्या आणि कामाला लागा. तुम्ही एकच करायचं आहे – माझं पत्र तुम्ही राहता त्या परिसरातील घराघरात स्वतः नेऊन द्यायचं आहे कारण व्यापक लोकसहभागाशिवाय आपलं हे आंदोलन यशस्वी होणार नाही. मला खात्री आहे; जास्तीत जास्त लोकांपर्यत हे पत्र पोहोचवण्याच्या कामात तुमच्याकडून जराही कुचराई होणार नाही असेही राज ठाकरे यांनी यात म्हटले आहे.

Previous articleकारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा : मुख्यमंत्र्यांनी अधिका-यांना खडसावले
Next articleफाशीची शिक्षा : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले मुंबई पोलीसांचे कौतुक