प्रत्येक वेळी अजित पवारांचे नाव येते पण ७५ लोकांचे नाव येत नाही …अजित पवारांची नाराजी

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणार असल्याची चर्चा आहे.मात्र अशा वेळी ७५ लोकांऐवजी प्रत्येक वेळी माझेच येते अशी नाराजी व्यक्त करतानाच मी संविधान,कायदा मानणारा आहे त्यामुळे माझी जे कुणी चौकशी करतील त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची माझी तयारी आहे अशी स्पष्ट भूमिका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडली.

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणार असल्याची चर्चा आहे.यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली.हे प्रकरण २०१२ पासूनचे आहे. प्रत्येक वेळी अजित पवारांचे नांव येते मात्र अजित पवार आणि ७५ लोकांची नांवे येत नाही फक्त अजित पवार यांचे नाव, फोटो येतो,वर्तमान पत्रात मथळा होते अशी नाराजी व्यक्त करीत त्यांचे सरकार आहे काय चौकशी करायची ती करा असे आव्हान त्यांनी दिले.या प्रकरणी माझी चौकशी सहकार विभागामार्फत,निवृत्त न्यायाधीशांमार्फत, सीआयडी, एसीबी आणि आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने केली मात्र आता आर्थिक गुन्हा अन्वेषण विभाग चौकशी करणार अशी पुन्हा बातमी कानावर आली परंतु याबाबत मला माहिती नाही असेही पवार यांनी स्पष्ट केले.

Previous articleमोठा दिलासा : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी पगार आणि निवृत्ती वेतन मिळणार
Next articleओ,भास्करशेठ तुम्ही आधी आणि आताही नाच्याचं चांगल काम करता,तेच करा.माझ्या नादी लागू नका !