राहुल गांधी यांचा हिरवा झेंडा आणि हिरव्या झेंड्याची मते एवढ्यापुरताच अभ्यास

मुंबई नगरी टीम

मुंबई । भारताच्या माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांनी लिहिलेल्या एका पत्रात स्वातंत्र्यवीर सावरकारांना त्यांनी भारताचा सुपुत्र म्हटले असून त्यांचा उल्लेख वीर सावरकर असा केला आहे. तसेच सावरकर यांनी ब्रिटिशांविरोधात अतिशय धाडसी युद्ध केले,त्याची नोंद इतिहासात होईल. असे नमूद केले आहे.राहुल गांधी यांनी स्वतःच्या आजीचे पत्र वाचलेले नाही.नेहरू यांनाही वाचलेले नाही. केरळ मधून निवडून आल्यामुळे हिरवा झेंडा आणि हिरव्या झेंड्याची मते एवढ्यापुरताच अभ्यास त्यांनी केलेला दिसतो. त्यामुळे त्यांचे विधान हे बेअक्कलपणाचे आहे अशी टीका मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली.

अकोला येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा वीर सावरकर यांचा मुद्दा उपस्थित केला.सावरकर यांच्याबाबत मी जे वक्तव्य केले होते त्यात चुकीचे काहीच बोललो नाही,जे ऐतिहासिक सत्य आहे तेच मी मांडले,असे सांगताना राहुल गांधी यांनी सावरकर यांनी ब्रिटीश सरकारला लिहिलेले पत्र दाखवून त्यातील काही मजकूरही वाचून दाखवला.त्यानंतर राहुल गांधी यांच्या या टीकेनंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत राहुल गांधींवर हल्लाबोल केला.राहुल गांधी यांनी स्वतःच्या आजीचे पत्र वाचलेले नाही.नेहरू यांना वाचलेले नाही. केरळ मधून निवडून आल्यामुळे हिरवा झेंडा आणि हिरव्या झेंड्याची मते एवढ्यापुरताच अभ्यास त्यांनी केलेला दिसतो.त्यामुळे त्यांचे विधान हे बेअक्कलपणाचे आहे अशी टीका त्यांनी केली.हिंदुस्थानची ज्यांच्याकडून अपेक्षा होती त्या उद्धव ठाकरेंनी तरी बोटचेपी भूमिका घेऊ नये, असे वाटत होते.पण सत्तेसाठी माती खाल्लेल्यांनी स्वतःच्या वडिलांच्याही विचारांना तिलांजली दिली. उद्धव ठाकरे तुम्ही बोटचेपी भूमिका का घेतली ? असा सवालही त्यांनी यावेळी केला.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वातंत्र्यप्राप्तीसाठी सक्रीय प्रयत्न केले होते.महात्मा गांधींनी त्याकाळी संघ कार्यक्रमात हजेरी लावली होती. सरसंघचालक केशव बळीराम हेडगेवार हे स्वातंत्र्यचळवळीत सहभागी होते. उद्धव ठाकरे या इतिहासापासून अनभिज्ञ आहेत.जे स्वतःच्या वडिलांचे विचार विसरले, त्यांच्याकडून इतिहासाच्या आकलनाची अपेक्षा नाही असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

Previous articleसरकारला भारत जोडो यात्रा रोखावी वाटत असेल तर जरुर रोखावी ! राहुल गांधींचे आव्हान
Next articleआज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले महत्वाचे १४ निर्णय ! स्वातंत्र्य सैनिकांसाठी मोठा निर्णय