ठाकरे सरकार घेणार मोठा निर्णय ; १०० युनिटपर्यंत वीज मोफत मिळणार

मुंबई नगरी टीम
मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार लवकरच राज्यातील सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा देणारी घोषणा करण्याची तयारी करीत आहे.दिल्लीतील सरकारच्या धर्तीवरअन्न,वस्त्र व निवाऱ्याप्रमाणेच विजेचा लाभ सर्वांना घेता यावा,आर्थिक परिस्थितीमुळे कोणीही वीजेपासून वंचित राहू नये म्हणून १०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्यास राज्य सरकार प्रयत्नशील आहे. शक्य झाल्यास भविष्यात हा आकडा २०० युनिटपर्यंत वाढवण्यात येणार आहे.राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ही माहिती दिली असून,त्याचा आराखडा तयार करण्याच्या सुचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

दिल्लीतील केजरीवाल सरकारच्या पावलावर पाऊल टाकत राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार राज्यातील वीज ग्राहकांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे.अन्न,वस्त्र व निवाऱ्याप्रमाणेच विजेचा लाभ सर्वांना घेता यावा,आर्थिक परिस्थितीमुळे कोणीही वीजेपासून वंचित राहू नये म्हणून १०० युनिटपर्यंत वापर करणा-या ग्राहकांना मोफत वीज देण्यास महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे.शक्य झाल्यास भविष्यात हा आकडा २०० युनिटपर्यंत वाढवण्यात येणार आहे.राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ही माहिती दिली आहे. त्याचा आराखडा तयार करण्याच्या सुचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

ऊर्जामंत्री राऊत यांनी नुकतीच वीजग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.राज्यात ५ हजार ९२७ कोटी रुपयांच्या वीजदरवाढीचा प्रस्ताव महावितरणने वीज नियामक आयोगाला दिला असून,यावर सुनावणी झाल्यानंतर एमईआरसी निर्णय घेणार आहे.हा निर्णय झाल्यानंतर वीजग्राहकांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल असे राऊत यांनी स्पष्ट केले.दिल्लीतील सरकारने २०० युनिटपर्यंत वीज वापरणा-या ग्राहकांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे.२०१ ते ४०० युनिटपर्यंत वापर असलेल्या ग्राहकांना वीज बिलावर ५० टक्के अनुदान देण्यात येते.हे अनुदान वीज वापराच्या युनिटवर दिले जाते.त्या प्रमाणेच राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देण्याच्या प्रयत्नात आहे. १०० युनिटपर्यंत वापर करणा-या ग्राहकांना मोफत वीज देण्यास मानस सरकारचा असला तरी भविष्यात हा आकडा २०० युनिटपर्यंत वाढवण्यात येणार आहे.

Previous articleपनवेलमधील महिलेला जाळल्याच्या प्रकरणातील आरोपींविरुध्द कठोर कारवाई
Next articleसरकारने शेतक-यांच्या नाईटलाईफची चिंता करावी : फडणवीस