परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आले आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अशा शेतक-यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देवून त्यांना दिलासा द्यावा अशा सूचना दिल्या आहेत.यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की,अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या काही दिवसात राज्यात परतीच्या पावसाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसला आहे. नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करावे.जिल्हाधिकाऱ्यांनी याकामी विशेष लक्ष घालावे.पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देवून त्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

Previous articleएसटी कर्मचाऱ्यांना सरसकट ५ हजारांची दिवाळी भेट; बँक खात्यात रक्कम जमा होणार
Next articleकालपर्यंत झालेल्या पावसाचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करून शेतक-यांना मदत देण्याचे निर्देश