बापरे…राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढली; आपल्या जिल्ह्यात किती रूग्ण संख्या वाढली ?

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ४४ हजार ५८२ वर पोहचली आहे. तर आज २९४० नविन रुग्णांचे निदान झाले आहे.आज ८५७ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १२ हजार ५८३ रुग्ण बरे झाले आहेत.राज्यात सध्या ३० हजार ४७४ रुग्णांवर उपचार आहेत.राज्यात आज ६३ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत १५१७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आज ६३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या १५१७ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये २७, पुण्यात ९,जळगावमध्ये ८, सोलापूरात ५, वसई विरारमध्ये ३, औरंगाबाद  शहरात ३, साता-यात २, मालेगाव १, ठाणे १, कल्याण डोंबिवली १, उल्हासनगर १, पनवेल १ तर नागपूर शहरात १ मृत्यू झाले आहेत. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ३७  पुरुष तर २६ महिला आहेत. आज झालेल्या ६३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २८  रुग्ण आहेत तर ३१  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ६३ रुग्णांपैकी ४६ जणांमध्ये (७३ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख ३२ हजार ७७७ नमुन्यांपैकी २ लाख ८८ हजार १९५ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४४ हजार ५८२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ६९ हजार २७५ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून २८ हजार ४३० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील:(कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: २७,२५१ (९०९)

ठाणे: ३६६ (४)

ठाणे मनपा: २२३४ (३३)

नवी मुंबई मनपा: १७७६ (२९)

कल्याण डोंबिवली मनपा: ७२७ (७)

उल्हासनगर मनपा: १४४ (३)

भिवंडी निजामपूर मनपा: ८२ (३)

मीरा भाईंदर मनपा: ३८८ (४)

पालघर:१०७  (३)

वसई विरार मनपा: ४५१ (१४)

रायगड: २९९ (५)

पनवेल मनपा: २८२ (१२)

ठाणे मंडळ एकूण: ३४,१०७ (१०२७)

नाशिक: ११५

नाशिक मनपा: ९३ (२)

मालेगाव मनपा: ७१० (४४)

अहमदनगर: ४९ (५)

अहमदनगर मनपा: २२

धुळे: १७ (३)

धुळे मनपा: ८० (६)

जळगाव: २८६ (३६)

जळगाव मनपा: १०९ (५)

नंदूरबार: ३२ (२)

नाशिक मंडळ एकूण: १५१३ (१०३)

पुणे: २८३ (५)

पुणे मनपा: ४४९९ (२३१)

पिंपरी चिंचवड मनपा: २११ (७)

सोलापूर: १० (१)

सोलापूर मनपा:५२२ (३२)

सातारा: २०४ (४)

पुणे मंडळ एकूण: ५७२९ (२८०)

कोल्हापूर:१७५ (१)

कोल्हापूर मनपा: २०

सांगली: ६२

सांगली मिरज कुपवाड मनपा: ९ (१)

सिंधुदुर्ग: १०

रत्नागिरी:  १३५ (३)

कोल्हापूर मंडळ एकूण: ४११ (५)

औरंगाबाद:२२

औरंगाबाद मनपा: ११६५ (४२)

जालना: ४६

हिंगोली: ११२

परभणी: १७ (१)

परभणी मनपा: ५

औरंगाबाद मंडळ एकूण: १३६७ (४३)

लातूर: ५८ (२)

लातूर मनपा: ३

उस्मानाबाद: २६

बीड: २६

नांदेड: १५

नांदेड मनपा: ८३ (४)

लातूर मंडळ एकूण: २११ (६)

अकोला: ३१ (२)

अकोला मनपा: ३३६ (१५)

अमरावती: ९ (२)

अमरावती मनपा:  १३६ (१२)

यवतमाळ: ११३

बुलढाणा:३९ (३)

वाशिम: ८

अकोला मंडळ एकूण:६७२ (३४)

नागपूर: ३

नागपूर मनपा: ४५७ (७)

वर्धा: ३ (१)

भंडारा: ९

गोंदिया: २८

चंद्रपूर:  ८

चंद्रपूर मनपा: ७

गडचिरोली: ९

नागपूर मंडळ एकूण:  ५२४ (८)

इतर राज्ये: ४८ (११)

एकूण:  ४४ हजार ५८२  (१५१७)

Previous articleठाकरे सरकारचा रुग्णांना दिलासा : खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा राखीव
Next articleरेकॉर्ड ब्रेक : आजच्या दिवशी एवढ्या तळीरामांना घरपोच दारू विक्री करण्यात आली