आम्ही लढणारे आहोत । ..तुरुंगाबाहेर आल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई नगरी टीम

मुंबई । आम्ही लढणारे आहोत अशी पहिली प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तुरुंगाबाहेर आल्यानंतर दिली.तुरुंगातून सुटल्याचा आनंद आहे.यामुळे न्यायालयावरील विश्वास वाढला.अटक बेकायदेशीर आहे असे न्यायालयाने म्हटले आहे.माझी प्रकृती बरी नाही.मी प्रसारमाध्यमांशी यावर सविस्तर बोलणार आहे असेही यावेळी राऊत म्हणाले.

पत्राचाळ प्रकरणी संजय राऊतांना सक्तवसुली संचालनालयाने ३१ जुलैला अटक केली होती.त्यानंतर त्यांना आज जामीन मिळाल्यावर ते तब्बल १०२ दिवसांनंतर तुरुंगाबाहेर आले.जामीन मंजूर झाल्यानंतर पावणे सातच्या सुमारास ते ऑर्थर रोड तुरुंगातून बाहेर आले आहेत. शिवसेनेचे शेकडो कार्यकर्त्यांनी तुरुगांबाहेर गर्दी करून संजय राऊतांचे जंगी स्वागत केले .यावेळी कार्यकर्त्यांनी तुरुंगाबाहेर फटाके फोडून आनंद व्यक्त केला.तुरुंगाबाहेर आल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की,आम्ही लढणारे आहोत.तुरुंगातून सुटल्याचा आनंद आहे.यामुळे न्यायालयावरील विश्वास वाढला.माझी प्रकृती बरी नाही. प्रसारमाध्यमांशी यावर सविस्तर बोलणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Previous articleआमचे आमदार खोके घेऊन गायब झालेत; शेतकऱ्यांनी आदित्य ठाकरेंकडे मांडली व्यथा
Next articleमहाराष्ट्राचे उद्योग राज्याबाहेर नेऊन मोदींनी तरुणांचे रोजगार नोक-या हिरावल्या