अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रपतींना साकडं

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील कोरोना संकटात विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत राज्याचे उच्च व शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ आणि महाविद्यालयच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच निर्णय घेतल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांच्या मिळालेल्या पाठिंब्यानंतर आता या परीक्षा रद्द करण्यात याव्यात अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने राज्यातील तहसीलदारांनामार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात येवून करण्यात आली.

सध्याच्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच याव्यात अशी मागणी राज्यातील विद्यार्थी आणि पालकांच्या मिळालेल्या पाठिंब्यानंतर युवक काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केलेल्या आवाहनानंतर राज्यभरातील युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यासाठी तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन दिले आहे.दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढत चालले आहेत.देशभरात १० लाखांपेक्षा जास्त रुग्ण सापडले असून, एकट्या महाराष्ट्रातच यापैकी 3 लाखाचा आकडा पार झाला आहे.अंतिम वर्षांच्या परीक्षा घेतल्या तर एकूणच विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात येऊ  शकते. समूह संक्रमणाचा धोका बघता अंतिम वर्षाच्या  परीक्षा रद्द कराव्यात, विद्यार्थ्यांकडून परिक्षाशुल्क घेऊ नये आणि मागील सत्राच्या मिळवलेल्या गुणांच्या आधारे गुण देऊन निकाल जाहीर करावा, या तीन मागण्या युवक काँग्रेसने निवेदनाद्वारे राष्ट्रपतींकडे  केल्या आहेत.

भारतात करोना रुग्णांची संख्या वाढत असून या विषाणूचे समूहसंक्रमण सुरू झाले आहे, असा दावा विविध वैद्यकीय तज्ज्ञांनी केला असताना देखील परीक्षा घेण्याचे आदेश काढणे म्हणजे जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांचे ,शिक्षकांचे व कुटुंबीयांचे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे, असे यावेळी  तांबे यांनी सांगितले.

Previous articleजय भवानी जय शिवाजी !..  शिवभक्तांना महाराजांच्या सिंहासनापर्यंत जाऊन दर्शन घेता येणार
Next articleओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांची ग्वाही