मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचे काम सुरु : एकनाथ शिंदे

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्याच्या विकास कामात केंद्र शासनाने पाठिंबा देणे आवश्यक असून केंद्र आणि राज्याने एकत्र बसून मेट्रो कारशेडबाबतचा वाद सोडवला तर या जागेवर जनतेच्या उपयोगाचा असलेला प्रकल्प पूर्ण करणे सोपे होईल.दरम्यान कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडला विरोध होत असल्याने कारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचे काम सुरु असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

नगरविकास मंत्री शिंदे म्हणाले की, लोकांच्या हिताला प्राधान्य देताना विकास प्रकल्प पूर्ण होणे आवश्यक असते.मेट्रो कारशेडबाबत केंद्र शासनाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. मात्र या प्रकल्पासाठी केंद्र शासन अनुकुलता दाखवत नसल्याने राज्य शासनामार्फत मेट्रेा कारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचे काम सुरु आहे. कांजूरमार्गची ४० हेक्टरची जागा ही ओसाड आहे.भविष्यातील गरज लक्षात घेऊन कारशेड कांजूरमार्गला करण्याचे प्रस्तावित होते. कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेल्याने मेट्रो ३,४ आणि ६ या लाईन्सचे एकत्रीकरण शक्य होणार आहे.तीनही लाईनचे कारडेपो एकत्र केले तर या जंक्शनमधून अंबरनाथ-बदलापूरपर्यंत लाईन नेणे शक्य होणार आहे. मात्र या जागेसाठी राज्य सरकारविरोधात केंद्र सरकार (खार जमीन आयुक्त) न्यायालयात गेले असल्याने आणि सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने याबाबत अधिक बोलता येणार नसल्याचेही नगरविकास मंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

नाणार प्रकल्पाबाबात बोलतना शिंदे म्हमाले की,नाणार प्रकल्प रद्द झाला आहे.नाणार प्रकल्पाला लोकांचा विरोध होता.शिवसेना लोकांबरोबर होती.उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री नव्हते तेव्हा देखील त्यांनी त्याभागाचा दौरा केला होता.शिवसेना लोकांच्या आणि भूमिपुत्रांच्या न्याय-हक्कासाठी लढत असते, असेही शिंदे म्हणाले.महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित निवडणुका लढवत आहोत आणि भविष्यातही कार्यकर्त्यांशी संवाद साधून एकत्रित कार्यक्रम राबवू,असे शिंदे यांनी सांगितले.

Previous articleराष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेले आमदार पुन्हा परतीच्या वाटेवर
Next articleभिवंडीच्या उपमहापौरांसह १८ नगरसेवकांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश