मंत्री उदय सामंतांनी घेतला बाळ मानेंचा खरपूस समाचार

मुंबई नगरी टीम

रत्नागिरी । भाजपाचे जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी टीका केल्यास त्याला उत्तर देईन मात्र बाळ मानेंची दखल कोणी घेत नाही.त्यांच्या शिव्या माझ्यासाठी ओव्या आहेत.यापुढे त्यांच्या कोणत्याही वक्तव्याची दखल घेतली जाणार नाही असे सुनावतानाच,प्रत्येकाला मंत्री व्हायला नशीब लागते.माझ्या नशीब होते म्हणून मी मंत्री झालो,अशी कोपरखळी मंत्री उदय सामंत यांनी बाळ मानेंना लगावली

राजापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री उदय सामंत बोलत होते.काही महाभाग स्वयंघोषित पत्रकारांनी माझी चूक नसताना माझ्या विरोधात बातम्या छापून आणल्या.काहींना झोप लागण्यासाठी गोळी घ्यावी लागते,पण माझ्यावर टीका करून झोप लागणार असेल तर काही हरकत नाही.भाजपाचे जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी माझ्यावर टीका केल्यास त्याला उत्तर देईन मात्र बाळ मानेंची दखल कोणी घेत नाही.त्यांच्या शिव्या माझ्यासाठी ओव्या आहेत.यापुढे त्यांच्या कोणत्याही वक्तव्याची दखल घेतली जाणार नाही.ज्यांना लोकाश्रय नाही, ज्यांना जनतेने दोन तीन वेळा नाकारलंय त्यांचा मी आदरच करतो.अशा शब्दात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बाळ माने यांचा समाचार घेतला.

उदय सामंत यांनी ४५ वयाच्या वरील नागरिकांना वा-यावर सोडल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.तसेच माहिती कार्यालयाला मिळालेल्या कॅमे-याचे त्यांच्या हस्ते एक क्लिक करून उद्घाटन झाले. अशी टीका विनय नातू आणि बाळ माने यांनी केली.होती त्यांच्या या टीकेला उदय सामंत यांनी उत्तर देत खरपूस समाचार घेतला.ही राजकारणाची वेळ नाही,या महामारीतून जनतेला दिलासा देणे हेच माझे ध्येय आहे असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.भाजपच्या अनेक पुढा-यांच्या सूचनांचे आजवर पालन करण्यात आले.बाळ माने यांनी सूचना केली यश फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांना सामावून घ्या,त्यानुसार आम्ही ६२ विद्यार्थिनींना आम्ही सामावून घेतले.अनेक आरोग्यविषयक सूचना त्यांच्याकडून मी घेतल्या,अजून देखील घेत राहीन.दीपक पटवर्धनांनी टीका केली तर त्याला उत्तर देऊ मात्र बाळ मानेंची दखल कोण घेत नाही.ते वरिष्ठ आहेत, मात्र प्रत्येकाला मंत्री व्हायला नशीब लागते.माझ्या नशीब होते म्हणून मी मंत्री झालो, अशी कोपरखळी मंत्री उदय सामंत यांनी बाळ मानेंना लगावली.

Previous articleकोरोना आणि मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा
Next articleमराठा आरक्षणाचा लढा अजून संपलेला नाही,सरकार यापुढेही प्रयत्न सुरूच ठेवणार