तोक्ते चक्रीवादळग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळग्रस्तांप्रमाणे नुकसानभरपाई

मुंबई नगरी टीम

मुंबई । गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावरील जिल्ह्यांना तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसून नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाईल अशी महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

गेल्या आठवड्यात तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला होता.रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जावून मुख्यमंत्र्यांनी पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला होता आणि तात्पुरती घोषणा न करता आढावा घेऊन व्यवस्थित मदत दिली जाईल व कुणालाही वंचित ठेवणार नाही असे आश्वस्त केले होते त्याप्रमाणे त्यांनी आज ही घोषणा केली आहे.त्यामुळे राज्यात आलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांना आता निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत मिळणार आहे.

Previous articleज्यांची जनतेने दखल घेतली नाही,तर माझ्यासारख्या मंत्र्याने का घ्यावी ? सामंतांचा राणेंवर प्रहार
Next articleम्युकरमायकोसिस आजारावर मोफत उपचार करणाऱ्या रुग्णालयांची यादी प्रसिद्ध करा