मला मुख्यमंत्री व्हावं असं वाटत नाही,उद्धव ठाकरेच पाच वर्षे मुख्यमंत्री राहतील !

मुंबई नगरी टीम

नाशिक : आपल्या बेधडक वक्तव्यासाठी परिचित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिक दौ-यावर असताना असेच एक वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं मात्र अजित पवार यांनी पुढील पाच वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील असे स्पष्ट करीत,मला मुख्यमंत्री व्हावं असं वाटत नाही,असे रोखठोक उत्तर एका प्रश्नावर दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर होते.त्यावेळी त्यांच्या हस्ते विविध कामांचा शुभारंभ झाला.त्यानंतर झालेल्या एका पत्रकार परिषदेत आपल्या खास अंदाजात प्रत्येक प्रश्नांना उत्तरे दिली.यावेळी त्यांना मुख्यमंत्री म्हणून बढती व्हावी असं वाटत नाही का ? असा प्रश्न विचारण्यात आला असता अजित पवार यांनी क्षणाचाही विलंब न लावता,मला मुख्यमंत्री व्हावं असं वाटत नाही असे उत्तर दिले.उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री असून,पुढील पाच वर्षे तेच मुख्यमंत्री राहतील असे त्यांनी स्पष्ट केले.आमच्याकडे १४५ आमदार असले तरी एकच व्यक्ती मुख्यमंत्री होतो.सध्या उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि ते पाच वर्षासाठी असल्याने याचा पाच वर्षे विचारच करायचा नाही,असे त्यांनी सांगितले.

Previous articleविधानसभा अध्यक्ष निवडीसाठी हालचाली सुरू; बहुमतापेक्षा जास्त मते घेवू : मविआचा दावा
Next articleमहाविकास आघाडी विस्कळीत होण्याच्या टप्प्यावर असल्याने संजय राऊत भांबावलेत