पूरग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा : सीईटीची परीक्षा ९ आणि १० ऑक्टोबरला होणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यात काही जिल्ह्यात गेली दोन दिवस अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे सीईटी प्रवेश परीक्षा जे विद्यार्थी देऊ शकले नाहीत.अशा विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी पुन्हा संधी देण्यात येत आहे असून,नोंदणी केलेल्या उमेदवारांना परीक्षा केंद्रांच्या उपलब्धतेनुसार केंद्र व नव्याने प्रवेशपत्र उपलब्ध करुन देऊन ९ व १० ऑक्टोबर रोजी पीसीएम व पीसीबी ग्रुपच्या अतिरिक्त परीक्षा घेण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे काही विद्यार्थी सीईटीच्या परीक्षेला बसू शकले नाहीत अथवा तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा पूर्ण करु शकले नाहीत,अशा उमेदवारांनी ई-मेलद्वारे,कार्यालयीन दूरध्वनी, केंद्र प्रमुख भेट आणि स्वत: सीईटी कक्षात येवून प्रत्यक्ष भेटीदरम्यान परीक्षा देवू न शकल्याचे विविध कारण सीईटी कक्षाकडे नोंदविले आहेत.त्यामध्ये विद्यार्थ्यांना कोरोना झाल्यामुळे,अतिवृष्टी, डेंगू,मलेरीया, टायफाईड इ. साथीचे आजार, ट्राफिक, रोड दुर्घटना आदी कारणांमुळे परीक्षा केंद्रावर पोहचण्यास अडचण, एकाच दिवशी दोन परीक्षा आल्यामुळे, परीक्षेचे पहिले सत्र ३० मिनिटाच्या आत तांत्रिक अडचण निर्माण होणे, परीक्षेला प्रत्यक्ष हजर असूनसुद्धा तांत्रिक अडचणीमुळे परीक्षेचा पुर्ण वेळ न मिळणे अशी कारणे नमूद केली आहेत.या कारणांचा सहानुभूतीपूर्वक विचार करता तसेच उमेदवारांचे शैक्षणिक हित लक्षात घेता पीसीएम ग्रुप करीता जवळपास २७ ते ३० हजार उमेदवारांनी प्रवेश पत्र डाऊनलोड करुन परीक्षा देवू शकले नाहीत अशा उमेदवारांना परीक्षेस बसण्यासाठी अंतिम संधी देण्यात देण्यात येणार आहे.

सामंत म्हणाले,वरील कारणांचा विचार करता पीसीएम आणि पीसीबी या दोन्ही ग्रुपच्या उमेदवारांना १ ऑक्टोबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत वरील कारणांना अनुसरुन पात्र उमेदवारांना ईमेल व एसएमएसद्वारे कळविण्यात येईल.या विद्यार्थ्यांनी परीक्षाशुल्क यापूर्वी भरली असल्यामुळे त्यांची निशुल्क नोंदणी करुन घेण्यात येईल.तसेच नोंदणी केलेल्या उमेदवारांना परीक्षा केंद्रांच्या उपलब्धतेनुसार केंद्र व नव्याने प्रवेशपत्र उपलब्ध करुन देऊन ९ व १० ऑक्टोबर रोजी पीसीएम व पीसीबी ग्रुपच्या अतिरिक्त परीक्षा घेण्याचे येणार आहे.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्याची पुन्हा संधी देण्यात येणार आहे. विद्यार्थी व पालक यांनी काळजी करू नये, असे आवाहनही सामंत यांनी केले.

Previous articleमराठवाडयात ओला दुष्काळ जाहीर करा; पंचनामे न करता तातडीने मदत द्या
Next articleराज्यातील महाविद्यालये केव्हा सुरू होणार ? मंत्री उदय सामंत यांनी दिली महत्वाची माहिती