शिवजयंतीच्या निमित्ताने शिवप्रेमींसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय

मुंबई नगरी टीम

मुंबई । छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण तर जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल, अशा गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली.आरोग्य नियमांचे पालन करून,सर्वांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींच्या जन्मोत्सव सोहळ्याचे क्षण साजरे करावेत, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

येत्या शनिवारी १९ फेब्रूवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असून,त्या अनुषंगाने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. त्या प्रस्तावास मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही मान्यता दिली आहे.तसे निर्देशही गृह विभागासह संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. शिवजयंती उत्सवासाठी विविध शिव प्रेरणास्थळांवरून शिवज्योती वाहून आणण्यात येतात. त्यासाठी या शिवज्योजी दौडीत दोनशे जणांना सहभागी होता येईल.तसेच शिव जन्मोत्सव सोहळ्यात पाचशे जण उपस्थितीत राहू शकणार आहेत.

Previous articleचंद्रकांत पाटील हे बोलतात कमी आणि बरळतात जास्त : रुपाली चाकणकरांचा टोला
Next articleप्रसाद लाड यांनी आव्हान देताच गनिमी काव्याने अतुल लोंढेंनी गाठला फडणवीसांचा बंगला