मुंबई नगरी टीम
मुंबई । सांगलीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यावरून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.पवार यांचे सर्व आयुष्य हे आग लावण्यामध्येच गेले असल्यामुळे त्यांनी पवार हे आडनाव बदलून ‘आगलावे’ करावे.अशी टीका खोत यांनी केल्यानंतर खोतांच्या या टीकेचा समाचार घेत राष्ट्रवादीनेही त्यांना जशास तसे उत्तर दिले आहे.
सांगलीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.शरद पवार हे महान नेते आहेत.त्यांनी या राज्यात काड्या करण्यापलीकडे काही केले नाही. जाईल तिथे आग लावायची आणि दुसऱ्या घराला परत आग लावायला निघून जायचे असा टोला लगावतानाच,पवार यांचे सर्व आयुष्य हे आग लावण्यामध्येच गेले असल्याने त्यांनी पवार हे आडनाव बदलून ‘आगलावे’ करावे अशी टीका खोत यांनी आज सोलापुरात बोलताना केली आहे.तर सत्तेपासून उपाशी असलेल्या सदाभाऊ खोतांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याने ते बरळू लागले असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी केली आहे.सदाभाऊ खोतांचे ‘उपाशी खोत’ असंच नामकरण करण्याची गरज आहे.भाजपच्या वळचणीला येऊन सत्तेत मंत्रीपद भोगलेले सदाभाऊ खोत यांना सत्ता गेल्यानंतर काहीच सुचेनासे झाले आहे असा टोलाही क्रास्टो यांनी लगावला आहे.ठरल्यानेच सदाभाऊ खोत पवार यांच्यावर बरळू लागले आहेत.त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत मात्र त्यांची पवार यांच्यावर बोलण्याइतपत लायकी नाही हे पहिले लक्षात ठेवावे असा स्पष्ट इशाराही क्रास्टो यांनी दिला आहे.