महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यास खोके सरकारला इच्छा नाही : आदित्य ठाकरे शिंदे सरकारवर बरसले

मुंबई नगरी टीम

मुंबई । महाराष्ट्रात हजारो रोजगार उपलब्ध करून देणारा वेदांत प्रकल्पाने आपला मोर्चा गुजरातला वळवला आहे.राज्यातील खोके सरकारवर विश्वास नसल्यानेच वेदांत प्रकल्प गुजरातला वळाला असे स्पष्ट होते.महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यास खोके सरकारला इच्छा नाही,अशी टीका शिवसेना नेते, युवासेना प्रमुख माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. पिस्तुल चालवणे,धक्काबुक्की करण्यापेक्षा महाराष्ट्रात गुंतवणूक कशी येईल यावर लक्ष द्या अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला सुनावले.

वेदांतचा प्रकल्प महाराष्ट्रात स्थापन न करता गुजरातला जाणार असल्याच्या बातमीवर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वेदांतचा प्रकल्प आहे तो गुजरातला गेलेला आहे. वेदांत आणि गुजरातला माझ्या शुभेच्छा आहेत. आपल्या देशात एवढा मोठा प्रकल्प येणे हे चांगलच आहे. तरी देखील या प्रोजेक्टसाठी एक वर्षात अनेक बैठका घेऊन अनेक भेटी देऊन पुण्याच्या जवळ हा प्रकल्प येईल अशी काळजी घेऊन आम्ही काम करत होतो. तेच पुढे नेत असताना मागच्या महिन्यात आम्ही बघितले की या खोके सरकारने देखील आमच्याच कामावर पुढे केलेले आणि महाराष्ट्राला आश्वासन केलेले की हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार आहे. तरीदेखील आज ही बातमी वाचून थोडा धक्का बसला आहे की हा मोठा प्रकल्प गुजरातला गेलेला आहे. कोणत्याही ही राज्यात गेले त्याचे दुःख नाही तरी देखील आपल्या राज्यात आले कसे नाही हे आश्चर्य आहे.ज्या प्रकल्पावर एवढे काम करून महाविकास आघाडी सरकारने एवढं सगळे पाठबळ देऊन हा प्रकल्प येथे आला नाही. याचा अर्थ हाच आहे की नवीन गुंतवणूकदारांना या खोके सरकारवर विश्वास नाही. आज आपण बघत आहात की खोके सरकार हे राजकारणात व्यस्त आहे. प्रशासनावर असेल, कायदा सुव्यवस्थेवर असेल कोणाचा अंकुश दिसत नाही आहे म्हणून या गोष्टी होत आहेत. माझी हीच विनंती राहील खोके सरकारला थोडे पिस्तूल काढणं, धक्काबुक्की करण खोके गुंड गर्दीची भाषा करणं सोडून द्यावं आणि मोठ्या इंडस्ट्रीजना आपल्या राज्यात आणण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून महाराष्ट्रातल्या तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल, असा सल्ला आदित्य ठाकरे यांनी दिला.

Previous articleमग गुजरातपेक्षा चांगले पॅकेज तुम्ही का दिले नाही ? उद्योगमंत्री उदय सामंतांचा आदित्य ठाकरेंना सवाल
Next articleशिंदे फडणवीसांना सभा घेण्यातून वेळ मिळत नसल्याने गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतला