भाजप पक्ष म्हणजे विझलेला दिवा; अंबादास दानवेंचा भाजपवर हल्ला

मुंबई नगरी टीम

नाशिक । राज्यातील भाजप म्हणजे विझलेला दिवा आहे, अशी सडकून टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मनमाड येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात भाजपवर केली.

अमित शाह जर सूर्य असतील तर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका महिन्यात निवडणुकीला सामोरे जावे हे आव्हान स्वीकारावे.मग कळेल दिवा कोण आणि सूर्य कोण ? निवडणुका घेण्यासाठी सरकार वारंवार चालढकल करत असून पळ काढत आहे. उद्धव ठाकरे यांचे आव्हान भाजप पेलू शकत नाही म्हणून असे बेताल वक्तव्य करत असल्याचा आरोप दानवे यांनी केला. एक दिवा काय करू शकतो हे बावनकुळेंना सांगण्याची गरज नाही असा टोलाही त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्या विधानावर लगावला.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर केलेल्या टिकेचाही शिवसेना स्टाईलने दानवे यांनी समाचार घेतला. ज्या शिवसेनेने राणे यांना भरभरून दिले त्यांच्यावर टीका केली ही नारायण राणे यांची नमकहरामी असल्याची टीका दानवे यांनी केली.

Previous articleआरोप केला राष्ट्रवादीने मात्र मुख्यमंत्र्यांच्या खासदार पुत्राने लक्ष्य केले उद्धव ठाकरेंना !
Next articleप्रकल्पासाठी राखून ठेवलेली जागा दाखवा आणि मगच आंदोलन करा