मुंबई नगरी टीम
नागपूर । ज्या महाराष्ट्रद्वेषी राज्यपालांनी महाराष्ट्राचा,छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला असून,घोटाळेबाज गद्दार मुख्यमंत्र्यांना वाचविण्यासाठी हा सर्व प्रकार सुरू आहे असे सांगतानाच, एका ३२ वर्षाच्या तरुणाने या खोके सरकारला हलवून ठेवले आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना केली.
आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर सभागृहातील वर्तनावर आक्षेप नोंदवीत टीका केली. ते म्हणाले सभागृहाचे लक्ष विचलित करण्याचा सत्ताधाऱ्यांचा हा प्रयत्न आहे.जे काही शोधायचे आहे ते शोधू द्या. महत्वाची गोष्ट म्हणजे एनआयटीचा जो घोटाळा आहे तो आम्हाला सभागृहात मांडू न देण्याचा हा प्रयत्न आहे.विरोधकांचा आवाज बंद करण्यात आला आहे,घोटाळा प्रकरणावरून सरकाराला विरोधकांनी घेरले आहे, त्या पासून लक्ष विचलीत करण्यासाठी सरकारचे उपदव्याप सुरु असल्याची टिका आदित्य ठाकरे यांनी केली.