नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार नाही

नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार नाही

मुंबई नगरी टीम

मुंबई : कोकणातील नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार असल्याचे स्पष्टीकरण गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तरात दिले होते. मात्र रायगड जिल्ह्यात हा तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी भूसंपादन करण्याचा प्रस्ताव उद्योग विभागाच्या विचाराधीन नसल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज लेखी उत्तरात स्पष्ट केल्याने या प्रकल्पावरून पुन्हा एकदा शिवसेना भाजप आमने सामने आल्याचे चित्र आहे.

अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात लेखी उत्तरात मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोकणातील नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार असल्याचे स्पष्ट करून,जमिनीचे भूसंपादन करण्याच्या अनुषंगाने रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने सिडकोकडून कागदपत्रे मागविली असून, संबंधित ४० गावातील ग्रामस्थांनी भूसंपादनास विरोध केला नसल्याचेही त्यांनी लेखी उत्तरात म्हटले होते. नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पासंदर्भात अनेक सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता त्याला दिलेल्या लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली होती.रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड, रोहा आणि श्रीवर्धन या चार तालुक्यातील ४० गावांतील सुमारे १३ हजार ४०९.५२ हेक्टर जिनमिनीवर एकात्मिक औद्योगिक वसाहत करण्याचा सिडकोचा मानस आहे. सिडकोच्या प्रस्तावास अनसरून शासन अधिसूचना १९ जानेवारी २०१९ अन्वये सदर क्षेत्र एकात्मिक औद्योगिक वसाहत नवनगर क्षेत्र म्हणून अधिसुचित करून या विकासासाठी सिडकोची नवनगर विकास प्राधिकरण म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. जमिनीचे भूसंपादन करण्याच्या अनुषंगाने भूमिअभिलेख जिल्हाधिकारी रायगड यांच्या कार्यालयाकडून कागदपत्रे सिडकोकडून मागविण्यात आली असून, या ४० गावातील ग्रामस्थांनी भूसंपादनास विरोध केला नसल्याचेही उत्तरात स्पष्ट करण्यात होते.

नाणार येथील तेल शुद्धीकरण प्रकल्पाबाबत आज विधानपरिषदेत हाच प्रश्न अनेक सदस्यांनी उपस्थित केला.नाणार येथे उभारला जाणारा तेल शुद्धीकरण प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय २ मार्च २०१९ रोजी घेण्यात आला असून,या साठी अधिसूचित करण्यात आलेले क्षेत्र अधिसूचनेद्वारे विनाअधिसूचित करण्यात आले असून, महसूली अभिलेखात आवश्यक त्या सुधारणा करण्याची कार्यवाही तातडीने करण्याबाबत रत्नागिरीच्या जिल्हाधिका-यांना कळविण्यात आल्याने पुन्हा त्याच ठिकाणी या प्रकल्पासाठी क्षेत्र अधिसूचित करण्याची अघिसूचना काढण्याच प्रश्न उपस्थित होत नसल्याचे उद्योगमंत्री देसाई यांनी लेखी उत्तरात सांगून,रायगड जिल्ह्यात तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी भूसंपादन करण्याचा प्कस्ताव उद्योग विभागाच्या विचाराधीन नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सौदी अरेबिया येथिल अराम्को तसेच इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम आदींच्या सहाय्याने आकारास येणारा हा सुमारे तीन लाख कोटींचा तेलशुद्धीकरण प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्य़ात राजापूर तालुक्यातील नाणारमध्ये उभारण्यात येणार होता. परंतु स्थानिक ग्रामस्थ आणि शिवसेनेने नाणार प्रकल्पाला तीव्र विरोध केला होता.लोकसभा निवडणुकीत भाजपबरोबर युती करताना नाणार येथिल हा प्रकल्प रद्द करण्याची अट घातली होती.त्यानंतर हा प्रकल्प रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

Previous articleअंमली पदार्थ विकणाऱ्यांना थेट फाशी देण्याचा कायदा करा
Next articleमराठा आणि आर्थिक दुर्बल घटकातील विध्यार्थ्यांना मोठा दिलासा