कोंढवानंतर मुख्यमंत्र्यांनी बोध घेतला नाही का? – सुप्रिया सुळे

कोंढवानंतर मुख्यमंत्र्यांनी बोध घेतला नाही का? – सुप्रिया सुळे

मुंबई नगरी टीम

मुंबई :  कोंढवा दुर्घटनेवरुन मुख्यमंत्री, चंद्रकांत पाटील आणि पुणे महानगरपालिकेने काही बोध घेतला नाही का? असा संतप्त सवाल राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

कोंढवा पाठोपाठ आता सिंहगड कॅम्पसमध्ये असाच प्रकार घडला असून काही मजूरांचा यात बळी गेला आहे. यावर खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. संरक्षक भिंती, घरे, निर्माणाधिन इमारतींची पाहणी करुन मजूरांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवा अशी मागणीही खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Previous articleनालेसफाईवर खर्च केलेले २०० कोटी कोणाच्या खिशात गेले
Next articleमुंबई महानगरपालिका बरखास्त करा-अजित पवार