नांदेड दक्षिणमध्ये सर्वाधिक तर सर्वात कमी चिपळूण मध्ये उमेदवार

नांदेड दक्षिणमध्ये सर्वाधिक तर सर्वात कमी चिपळूण मध्ये उमेदवार

मुंबई नगरी टीम

मुंबई :  उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर आता राज्यातील विधानसभा निवडणूकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. चिपळूण मतदार संघात सर्वात कमी ३ तर नांदेड दक्षिण मतदारसंघात सर्वाधिक ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत दुपारी ३ वाजता होती. या मुदतीत राज्यातील विविध मतदारसंघातून अनेक उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतल्याने आता २८८ जागांसाठी सुमारे ३ हजार पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात आहेत. सर्वाधिक ३८ उमेदवार हे नांदेड दक्षिण मतदार संघातून रिंगणात आहेत तर सर्वांत कमी ३ उमेदवार हे चिपळूण मतदार संघात आहेत.अकोले, शहादा,बोरीवली, माहिम आणि बांद्रा मतदार संघात प्रत्येकी ४ उमेदवार रिंगणात आहेत.नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदार संघात एकूण ९१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.मात्र आज ९४ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने आता येथे ७ उमेदवार रिंगणात आहेत.१५ उमेदवार असतील त्या ठिकाणी १ तर ३५ उमेदवार असलेल्या ठिकाणी २ मतदान यंत्रे उपलब्ध केली जाणार आहेत. त्यापेक्षा जास्त उमेदवार असलेल्या ठिकाणी ३ मतदान यंत्रे लावण्यात येणार आहे.त्यामध्ये जालना नांदेड आणि औरंगाबाद ( पूर्व) मतदार संघाचा समावेश आहे.

Previous articleकाँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे सरकार आल्यास शेतक-यांना सरसकट कर्जमाफी
Next articleमुंबई शहर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात एकुण ८९ उमेदवार