हिंमत असेल तर फडणवीसांनी लोकसभेची निवडणूक घ्यावी

मुंबई नगरी टीम
मुंबई : विधानसभा निवडणुकीपेक्षा हिंमत असेल तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेची निवडणूक घ्यावी असे प्रतिआव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज दिले आहे.

राज्यात महाआघाडीचे सरकार चांगल्या प्रकारे काम करत आहे.परंतु भाजपाला अजूनही सत्तेचे स्वप्न पडत असल्याने ते रोज ऊठसूट काहीही विधान करत सुटले आहेत. नवी मुंबई येथे झालेल्या भाजपच्या मेळाव्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिंमत असेल तर निवडणुका घ्या असे आव्हान महाविकास आघाडीला केले होते. त्याच्या या वक्तव्याचा नवाब मलिक यांनी चांगलाच समाचार घेतला.राज्यातील सत्ता हातून गेल्याने भाजपचे नेते सैरभैर झाले आहेत.भाजप नेत्यांना सत्तेचा आजार झाला आहे,दिवसभर सत्तेत कसा येऊ याचा विचार करतात,रात्री रोज त्यांना सत्तेची स्वप्न पडतात.यामुळे हा आजार वाढत जाणार असून,आम्हाला त्यांची काळजी वाटते. त्यामुळे त्यांनी चांगल्या डॉक्टरांकडून उपचार घ्यावा असा टोलाही मलिक यांनी लगावला.

भाजपाच्या नेत्यांना आमच्यात वाद आहेत असे दाखवण्याची सवय झाली आहे. मात्र ते वास्तव नाही.आम्ही आघाडीतील सर्व मंत्री एकजुटीने काम करत असल्याचेही मलिक यांनी सांगितले.

Previous articleफडणवीसांचे आव्हान स्वीकारण्यास तयार : अस्लम शेख
Next articleजिल्हा परिषदा निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार