विद्यापीठ,महाविद्यालय आणि सीईटी परीक्षेचे वेळापत्रक दोन दिवसात जाहीर होणार 

मुंबई नगरी टीम         

मुंबई : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यातील विद्यापीठ,महाविद्यालय आणि सीईटी परीक्षेचे वेळापत्रक दोन दिवसात जाहीर करण्यात येणार असून, एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

राज्यातील सर्व कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे परीक्षेसंदर्भात नियुक्त केलेल्या  समितीच्या अहवालावर  सविस्तर चर्चा करण्यात आली. या समितीचा अहवाल लवकरच राज्य  शासनाला सादर केला जाईल त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगत सिंह  कोश्यारी यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय  घेण्यात येईल.बैठकीत पदवी आणि पदवीत्तर शेवटच्या वर्षाच्या परीक्षा १ जुलै ते १५ जुलै राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) येत्या २० ते ३० जुलै  दरम्यान घेण्यात येतील का आणि  या परीक्षांचा निकाल १५ ऑगस्ट पर्यंत जाहीर करून  दिनांक १ सप्टेंबर २०२० पासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरूवात करण्यात येईल का?तसेच लॉकडाऊनचा  कालावधी विद्यार्थ्यांसाठी मानवी हजार दिवस  म्हणून ग्राह्य धरण्यात यावा.कॅरी फॉरवर्ड योजना लागू करून पुढील वर्गात प्रवेश देण्यात येईल आणि शेवटच्या वर्षाची परीक्षा घेण्यात यावे एम.फिल व पी.एचडी चा मौखिकी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून घेण्यात येऊन या विद्यार्थ्यांचा लघुशोधप्रबंध आणि प्रबंध सादर करावयाची मुदत निघून गेली असल्यास  त्यांना मुदतवाढ देण्यात येईल का? यावर सविस्तर चर्चा करण्यात आली परंतु राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन यावर अंतिम  निर्णय घेण्यात येईल. असेही सामंत यांनी संगितले.

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक  जिल्ह्यांमध्ये एक आणि मोठ्या जिल्ह्यांमध्ये दोन समुपदेशन केंद्राची निर्मिती करण्यात यावी. समुपदेशन केंद्राच्या मदतीने संबंधित जिल्ह्यातील पालक आणि विद्यार्थ्यांच्या सर्व अडचणींचे समाधान करण्यात येईल. अशा सूचना सामंत यांनी यावेळी दिल्या.बारावीनंतर अभियांत्रिकी आणि इतर अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा घेण्याबाबत  महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. बारावी नंतर आणि पदव्युत्तर साठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेचे नियोजन संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या समितीने सर्व उपाययोजना करून आपले वेळापत्रक तयार करावे.असेही  सामंत यांनी संगितले.

Previous articleअन्यथा दारुंची दुकाने बंद करा
Next articleआता दारू घेण्यासाठी टोकन पद्धत; ४०० ग्राहकांनाच मिळणार दारू