ठाकरे सरकारच्या नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी ईडीचा वापर

मुंबई नगरी टीम

मुंबई । महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी ईडीचा वापर होतो आहे असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.

निव्वळ महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनाच नव्हे तर देशातील भाजपविरोधी भूमिका घेणाऱ्यांना त्रास देणे व त्यांच्या त्रुटी असतील तर त्या हुडकून काढण्याचा प्रयत्न यंत्रणा करताना दिसत आहेत. ज्यांना नोटीसा आल्या आहेत ते नेते सडेतोड उत्तर देतील पण सरकार बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे असेही पाटील म्हणाले.अनिल देशमुख यांच्याबाबतीत एक नंबर कोण हे वाझे व इतरांच्या जवाबात सिद्ध झाले आहे. अनिल देशमुख यांचा या केसमध्ये संबंध नाही हे पुन्हा उघड झाले आहे. शिवाय अनिल परब यांच्याविरोधात वेगवेगळ्या पध्दतीने दबाव आणून स्टेटमेंट घेतले जातेय हे चुकीचे काम सुरू आहे असेही पाटील म्हणाले.

Previous articleएसटी कर्मचारी आणि कुटुंबीय आर्थिक,मानसिक तणावात : फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Next articleराज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ आमदारांचा प्रश्न मार्गी लागणार ?