सुरू झालेल्या शाळा परत बंद करायच्या नाहीत हा निर्धार ठेऊया

मुंबई नगरी टीम

मुंबई । आजपासून सुरु झालेल्या शाळा परत बंद करायच्या नाहीत अशा निर्धाराने शिक्षण सुरू ठेवू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.राज्यातील सर्व विद्यार्थी,शिक्षक यांच्याशी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला व त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ते बोलत होते. शाळा सुरु करुन आपण मुलांच्या विकासाचे, प्रगतीचे दार मुलांसाठी उघडतो आहोत.मात्र मुलांची अधिक काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे,असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

कोरोनासाठीचे निर्बंध शिथील करून राज्यातील शाळांची प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली.या पार्श्वभूमीवरमुख्यमंत्र्यांच्या हस्ते माझे विद्यार्थी माझी जबाबदारी या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.आज जेव्हा सर्व विद्यार्थी पुन्हा एकदा शाळेत जाणार आहेत.तेव्हा मला माझे शाळेचे दिवस आठवत आहेत.सुटीनंतर शाळेचा पहिला दिवस उत्साहाने भरलेला असायचा.मित्रांना भेटण्याची उत्सुकता असायची, नवीन वह्या-पुस्तके,गणवेश मिळायचे. आत्ताच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला हा सर्वात आव्हानात्मक काळ सुरू आहे. मुलं ही फुलासारखी नाजूक असतात, त्यांचे वय घडण्याचे असते या विषयावर टास्क फोर्सशी नियमित चर्चा होत असते.शाळा सुरु करताना वर्ग खोल्यांची दारे बंद नसावीत,हवा खेळती असावी, शाळेंचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे. निर्जंतुकीकरण करताना मुलांच्या आरोग्याला अपाय होणार नाही याची देखील काळजी घ्यावी असे मुख्यमंत्र्यांनी आवर्जुन सांगितले.

आपल्या पाल्याची जबाबदारी आपण स्वतः घ्या. पावसाळ्यामुळे तसेच इतर अनेक साथीचे रोग येत आहेत. त्यामुळे प्रकृतीकडे लक्ष ठेवावे. स्वःताला बरे वाटत नसेल तर शंका आल्यास लगेच कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन ठाकरे यांनी केले.

Previous articleउत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य नव्हे तर तालीबानी राज : नाना पटोलेंचा घणाघात
Next articleमार्डच्या मागण्यांवर त्वरित योग्य तोडगा काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश