सरन्यायाधीशांनी केलेल्या प्रश्नांवरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला टोला

मुंबई नगरी टीम

जालना । देशाच्या सरन्यायाधीशांनी शिंदे गटाला ‘तुम्ही कोण आहात’ असा प्रश्न विचारला आहे. त्यामुळे त्यांनी आधी त्या प्रश्नाचे उत्तर द्यावे, त्यानंतर इतर प्रश्नांचा निकाल लागेल.शिवसेनेचा आणि निवडणुकांचा धसका घेतल्याने त्यांनी रिट याचिका दाखल केली असल्याची सडकून टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर केली.

याशिवाय शिंदे गटाने शिवसेनेचे चिन्ह गोठवण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात केली आहे, त्यावर बोलताना दानवे म्हणाले की, याचा अर्थ शिंदे गटाला आगामी निवडणुकांना सामोरे जाण्याची भीती वाटत आहे.शिवाजी पार्क सरकारला ब्लॉक करता येणार नाही राज्यात लोकशाही आहे, सरकारीची दादागिरी चालणार नाही तर जनतेची दादागिरी चालते. गेल्या ५६ वर्षांपासून सातत्याने शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होत आहे. यावेळी देखील शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील. ही लोकशाही आहे आणि लोकशाहीत सरकारला जनतेच्या मतानुसार वागावं लागतं. लोकशाहीत दादागिरी करून चालत नाही, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर थेट हल्लाबोल केला आहे.संभाजीनगर येथे आयकर विभागाने टाकलेल्या धाडीवर बोलताना दानवे म्हणाले की, जनता भाजपला बधत नाही, त्यामुळे ईडी, सीबीआय, आयकर सारख्या शासकीय यंत्रणांचा वापर करून दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे.

Previous articleबारामतीत एखाद्यावेळी सुर्य पश्चिमेकडे उगवेल मात्र बारामती शरद पवारांना सोडणार नाही
Next articleराज्याला दोन मुख्यमंत्र्यांची गरज ! मंत्र्यांकडे वेळ मागूनही मिळत नाही : सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली खंत