एकमेकांना लाथा मारल्याने उद्धव ठाकरेंचा एक पाय लांब : जयंत पाटील

मुंबई नगरी टीम

सातारा: सरकारमध्ये असूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकमेकांना इतक्या लाथा मारल्या आहेत की त्यामुळेच उद्धव ठाकरेंचा एक पाय लांब झाला आहे,अशी जोरदार टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज केली.साताऱ्यातील पक्षाच्या परिवर्तन मेळाव्यात ते बोलत होते.

सरकारवर आणि भाजपवर जयंत पाटील यांनी कडाडून टीका केली.ते म्हणाले की,नरेंद्र आणि देवेंद्र या माणसांच्या कर्तबगारीमुळे देशातील प्रत्येकाच्या डोक्यावर एक लाखाचे कर्ज आहे.महाराष्ट्र राज्य आर्थिक संकटात आहे.फडणवीस सरकारने कर्जाचे डोंगर उभे करून ठेवले आहेत.सरकार अनेक योजनांची घोषणा करत असले तरीही सरकारी तिजोरीत पैसा कुठे आहे,असा सवाल त्यांनी केला.

मुख्यमंत्री फक्त मोठमोठ्या घोषणा करत आहेत.मात्र त्या अमलात आणण्यासाठी सरकारकडे पैसाच नाही.निवडणुकीसाठी ते खोटी आश्वासने देत आहेत,असाही आरोप यावेळी जयंत पाटील यांनी केला. तसेच भाजप आणि शिवसेना यांच्यातील सत्तेत भागीदार असून सुरू असलेल्या लाथाळ्यांवर त्यांनी लाथा मारून मारूनच उद्धव यांचा एक पाय लांब झाला आहे,असे मला वाटते,असा टोला लगावला. निर्धार यात्रेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते भाजपवर कडाडून टीका करत आहेत. यापुढे ही टीका आणखी कडक होत जाणार आहे

Previous articleढोबळेंना तिकीट दिल्यास बनसोडे राष्ट्रवादीत जाणार ?
Next articleयुती झाली तरी मी उभा राहणार : अर्जुन खोतकर