पुन्हा जयंतराव पाटील ऑन ग्राऊंड…सांगलीतील पूरग्रस्त भागांना दिल्या भेटी

मुंबई नगरी टीम

सांगली । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील हे २०१९ च्या महापूरादरम्यान ज्यापद्धतीने पूरग्रस्तांच्या मदतीला धावून गेल्याचे दिसले होते आज त्याचपद्धतीने जयंत पाटील पूरग्रस्त भागात ऑन ग्राऊंड उतरले होते.पूरग्रस्त गावांना भेट देत त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.

सांगलीला असलेल्या संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज सकाळपासूनच पूरग्रस्त गावांना भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी आज सकाळी वाळवा तालुक्यातील बहे, हुबालवाडी, बोरगाव या गावांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि नागरीकांना धीर देण्याचा प्रयत्न केला.परवापासून हाहाकार माजवलेल्या पावसाने आज उसंत घेतली आहे. मात्र अजूनही पाण्याचा निचरा झालेला नाही असे मंत्री पाटील यांनी सांगितले. सांगली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कृष्णा नदीचे पाणी शिरले आहे. जीवितहानी होऊ नये, नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने लोकांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला होता. खबरदारी म्हणून या स्थलांतरीतांची अँटीजन टेस्टही केली जात आहे. पूराच्या काळात कोविडचा संसर्ग वाढू नये म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

Previous articleपूरग्रस्तांना १० किलो गहू,१० किलो तांदूळ आणि पाच लिटर रॅाकेल मोफत देणार
Next articleमराठा आरक्षणासाठी मंत्री अशोक चव्हाण यांचे महत्वाचे पाऊल; खासदारांना केले ‘हे’ आवाहन