पुन्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होऊ शकतात : माजी मंत्र्याचे सूचक वक्तव्य

मुंबई नगरी टीम

मुंबई । आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी नंतर माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केले आहे.जयंत पाटील यांनी पुन्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होऊ शकतात असे म्हटल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले. अरुणाचल प्रदेश प्रमाणे महाराष्ट्राच्या बाबतीत ही निकाल लागू शकतो असेही जयंत पाटील म्हणाले.

राज्यपालांना पुन्हा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करावे लागेल असे वक्तव्य यापूर्वी माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी केले होते. आज आमदारांच्या अपात्रतेबाबत न्यायालयात सुनावणी झाल्यावर पाटील यांनी पुन्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होऊ शकतात असे वक्तव्य केले आहे.त्यांच्या या सूचक वक्तवानंतर पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.त्यांनी यावेळी शिवसेनेचे वकील कपिल सिबल यांनी केलेल्या युक्तिवादावर समाधान व्यक्त केले.

Previous articleकाँग्रेसचा एल्गार ! उद्या केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेस करणार तीव्र आंदोलन
Next articleओबीसींच्या हिताचं सरकार आल्यामुळे हा निकाल लागला : पंकजा मुंडेंनी व्यक्त केला आनंद