राणेंनी मार्च ही जास्तच मुदत दिली …..जयंत पाटलांचा नारायण राणेंना टोला !

मुंबई नगरी टीम

मुंबई । गेली दोन वर्ष विरोधक आघाडी सरकार जाण्याच्या वेगवेगळ्या तारखा देत आहेत मात्र नारायण राणे यांनी मार्च ही जास्तच मुदत दिली त्याबद्दल नारायण राणे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आभार मानले आहेत.

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आघाडी सरकार मार्चपर्यंत जाणार असे भाकीत केले आहे त्यावर बोलताना जयंत पाटील यांनी नारायण राणे यांच्या भाकीताची खिल्ली उडवली आहे. आतापर्यंत भाजपच्या नेत्यांनी पाच – सहा वेळा वेगवेगळ्या तारखा दिल्या आहेत. लोकांना आशेवर ठेवणं ही त्यांची जबाबदारी आहे हे मी समजू शकतो असा टोलाही पाटील यांनी यावेळी लगावला आहे. त्यांचा पक्ष टिकवायचा असेल तर अशी आश्वासने व असं वातावरण कायम ठेवावं लागतं अशी टीकाही जयंत पाटील यांनी यावेळी केली.

Previous article२३ वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता ‘त्या’…मलिकांचा राणेंना टोला
Next article‘या’ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी २१ डिसेंबरला निवडणूक