ओमिक्रोन विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विमानतळावरील निर्बंध आणखी कडक

मुंबई नगरी टीम

मुंबई । दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणू ओमिक्रोनचे संकट घोंगावत असताना आंतरराष्ट्रीय विमानतळावर निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहे.कोरोना संक्रमणाचा सर्वाधिक धोका असलेल्या देशातून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना प्राधान्य क्रमाने वेगळा काउंटर बनवून एम.आय.ए.एल आणि विमानतळ प्राधिकरण यांना पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.अशा सर्व प्रवाशांना सात दिवसांकरिता संस्थात्मक विलगीकरण करणे आवश्यक असेल.त्याच प्रमाणे दुसऱ्या,चौथ्या आणि सातव्या दिवशी त्यांचे आर.टी.पी.सीआर चाचण्याही केल्या जाणार आहेत.संबंधित पॉझिटिव आढळल्यास त्यांना इस्पितळात दाखल करण्यात येईल तर चाचण्या निगेटीव्ह आल्यास अशा व्यक्तीला सात दिवस गृह विलगीकरणात राहावे लागणार आहे.

ओमिक्रोन या या नवीन विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने अनेक देशांना कोरोना संक्रमणाचा सर्वाधिक धोका असलेले देश म्हणून घोषित केले आहे.सदर विषाणूचा प्रसार महाराष्ट्रामध्ये रोखण्यासाठी राज्यात हवाई वाहतूकीच्या यासंदर्भात तातडीने अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत.त्यानुसार २८ नोव्हेंबर रोजी भारत सरकारने लावलेले निर्बंध आणि त्याच्याशी संबंधित जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे किमान निर्बंध म्हणून तत्कालिक प्रभावाने अमलात येणार आहेत.विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमानाद्वारे येणाऱ्या सर्व प्रवाशांना त्यांनी मागील पंधरा दिवसात ज्या ज्या देशांना भेट दिलेली आहे.त्यांची सविस्तर माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.कोरोना संक्रमणाचा सर्वाधिक धोका असलेल्या देशातून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना प्राधान्य क्रमाने वेगळा काउंटर बनवून एम.आय.ए.एल आणि विमानतळ प्राधिकरण यांनी त्यांची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.अशा सर्व प्रवाशांना सात दिवसांकरिता संस्थात्मक विलगीकरण करणे आवश्यक असेल.त्याच प्रमाणे दुसऱ्या, चौथ्या आणि सातव्या दिवशी त्यांचे आर.टी.पी.सी. आर चाचण्याही केल्या जातील. कोणत्याही चाचणीत ते पॉझिटिव आढळल्यास त्यांना इस्पितळात दाखल करण्यात येईल आणि जर चाचण्या निगेटीव्ह आल्या तर अशा प्रवाशांना सात दिवस गृह विलगीकरणात राहावे लागणार आहे.

धोकादायक नसलेल्या इतर देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी आर.टी.पी.सी. आर चाचणी विमानतळावर उतरल्यावर करणे बंधनकारक असेल आणि चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्यासही त्यांना १४ दिवस गृह विलगीकरणात राहावे लागेल. जर या प्रवाशांपैकी कोणी पॉझिटिव्ह असेल तर त्यांना इस्पितळात भरती केले जाणार आहे.कंनेक्टींग फ्लाईट असलेल्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय यात्रेकरूला भारतातल्या कोणत्याही विमानतळावर जायचे असेल तर त्यांना महाराष्ट्रामध्ये विमानतळावर पहिल्यांदा आल्या आल्या आर.टी.पी.सी.आर चाचणी करावी लागेल आणि निगेटिव्ह अहवाल आल्यास त्यांना कनेक्टिंग विमानांमध्ये बसण्याची परवानगी देण्यात येईल. अशा प्रवाशांची माहिती ते ज्या ठिकाणी उतरणार असतील तिथल्या गंतव्य विमानतळाला देण्यात येईल जेणेकरून येथील विमानतळ या यात्रेकरूंसाठी वेगळी व्यवस्था करू शकतील. जर असे यात्रेकरू महाराष्ट्रामध्ये विमानतळावर कनेक्टींग फ्लाईट घेत असतील तर आंतरराष्ट्रीय विमानाने थेट उतरणाऱ्या प्रवाशांना विलगीकरणासंबंधी उल्लेखित सर्व पथ्य पाळावे लागतील.

देशांतर्गत हवाई प्रवासासाठी राज्यामध्ये प्रवास करणाऱ्या सर्व यात्रेकरूंना पूर्णपणे लसीकरण असणे आवश्यक आहे. असे नसेल तर त्यांच्याजवळ आगमनाच्या ४८ तासा अगोदर चे आर.टी.पी.सी.आर अहवाल असणे बंधनकारक असेल.इतर राज्यातून येणारे हवाई यात्रेकरूंसाठी आगमनाच्या ४८ तासाच्या आतील निगेटिव आर.टी.पी.सी. आर चाचणी अहवाल असणे आवश्यक आहे, यात कोणताही अपवाद नसेल.

Previous articleममता बॅनर्जींच्या भेटीवर काय म्हणाले ..शरद पवार ! केले मोठे वक्तव्य
Next articleभाजपाविरोधातील लढाई अंहकाराने नव्हे तर एकजुटीने लढली पाहिजे