११६६ ग्रामपंचायतींसाठी येत्या १३ ऑक्टोबरला मतदान ; थेट सरपंचपदांची निवड होणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । विविध १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यातील एकूण १ हजार १६६ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येत्या १३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.तर १४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल.त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या एकूण १ हजार १६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची नोटीस संबंधित तहसीलदार १३ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करतील.या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज २१ ते २७ सप्टेंबर या कालावधीत दाखल करण्यात येतील. शनिवार व रविवारच्या सुट्टीमुळे २४ व २५ सप्टेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाहीत.उमेदवार अर्जाची छाननी 28 सप्टेंबरला करण्यात येईल. तर ३० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत आहे.छाननी झाल्यानंतर त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.१३ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असणार आहे.मतमोजणी १४ ऑक्टोबर रोजी होईल. समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा राखीव आहेत.

विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या पुढील प्रमाणे: ठाणे: कल्याण- ७, अंबरनाथ- १, ठाणे- ५, भिवंडी- ३१, मुरबाड- ३५, व शहापूर- ७९. पालघर: डहाणू- ६२, विक्रमगड- ३६, जवाहार- ४७, वसई- ११, मोखाडा-२२, पालघर- ८३, तलासरी- ११ व वाडा- ७०. रायगड: अलिबाग- ३, कर्जत-२, खालापूर-४, पनवेल-१, पेण- १, पोलादपूर- ४, महाड- १, माणगाव- ३ व श्रीवर्धन- १. रत्नागिरी: मंडणगड- २, दापोली- ४, खेड- ७, चिपळूण- १, गुहागर- ५, संगमेश्वर- ३, रत्नागिरी- ४, लांजा- १५ व राजापूर- १०. सिंदुदुर्ग: दोडामार्ग- २ व देवडगड- २. नाशिक: इगतपुरी- ५, सुरगाणा- ६१, त्र्यंबकेश्वर- ५७ व पेठ- ७१. नंदुरबार: अक्कलकुवा- ४५, अक्राणी- २५, तळोदा- ५५ व नवापूर- ८१. पुणे: मुळशी- १ व मावळ- १. सातारा: जावळी- ५, पाटण- ५ व महाबळेश्वर- ६. कोल्हापूर: भुदरगड- १, राधानगरी- १, आजरा- १ व चंदगड- १. अमरावती: चिखलदरा- १. वाशीम: वाशीम- १. नागपूर: रामटेक- ३, भिवापूर- ६ व कुही- ८. वर्धा: वर्धा- २ व आर्वी- ७. चंद्रपूर: भद्रवाती- २, चिमूर- ४, मूल- ३, जिवती- २९, कोरपणा- २५, राजुरा- ३० व ब्रह्मपुरी- १. भंडारा: तुमसर- १, भंडारा- १६, पवणी- २ व साकोली- १. गोंदिया: देवरी- १, गोरेगाव- १ गोंदिया- १, सडक अर्जुनी- १ व अर्जुनी मोर- २. गडचिरोली: चामोर्शी- २, आहेरी- २, धानोरा- ६, भामरागड- ४, देसाईगंज- २, आरमोरी-२, एटापल्ली- २ व गडचिरोली- १. एकूण- १,१६६

Previous articleमुख्यमंत्री राज्यपाल भेटीनंतर राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ! अनेक चर्चांना उधाण
Next articleएकनाथ शिंदे शिवसेनेला पुन्हा दणका देण्याच्या तयारीत;खासदार,आमदार,नगरसेवक शिंदे गटात ?