… तर त्यांना विधानसभेत पोचू देणार नाही : जयंत पाटील

… तर त्यांना विधानसभेत पोचू देणार नाही : जयंत पाटील

मुंबई नगरी टीम

सोलापूर : जर कुणाची बुद्धी फिरली आणि पक्ष सोडला तर त्यांना विधानसभेत पोचू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मोहोळच्या जाहीर सभेत दिला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून जाणा-या लोकांचा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला.

सुर्याजी पिसाळांच्या अवलादींशी कसं वागायचं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले होते तोच धडा गिरवत सुर्याजी पिसाळांशी दोन हात करण्यास जनता सज्ज झाली आहे असेही पाटील यांनी सांगितले. जे पक्ष सोडून जात आहेत त्यामुळे आमचा पक्ष स्वच्छ होत आहे. पुन्हा एकदा सत्ता तरुणांच्या हातात देण्याचा प्रयत्न होणार आहे. शरद पवार साहेबांनी तरुणांना दिलेली ताकद हीच आहे असेही पाटील म्हणाले.

लोकसभेत काय झालं ते सर्वांना ठाऊक आहे. आता विधानसभेत जर तसंच केलात तर राज्यातील जनता तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण होवू देणार नाही हे लक्षात ठेवा असा निर्वाणीचा इशारा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मोहोळच्या जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांना दिली.पुढील २५ वर्षे आमचीच सत्ता येणार असे मुख्यमंत्री सांगत आहेत परंतु मोहोळमध्ये उसळलेल्या या जनसागराची दखल तुम्हाला घ्यावीच लागेल असे मुख्यमंत्र्यांच्या विधानावर बोलताना खा. कोल्हे यांनी समाचार घेतला. त्यांनी आपल्या दमदार भाषणात पुन्हा एकदा सरकार आणि सरकारच्या मंत्र्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले.

Previous articleविधानसभेसाठी शिवसेनेशी युती होणारच : मुख्यमंत्री
Next articleया तारखेला लागू शकते आचारसंहिता !